"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८०:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही व्यक्तींची मते/विधाने/विचार खालिलप्रमाणे आहेत.
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''१९२३ साली डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील त्यांच्या ‘द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी’ या प्रबंधाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली. ही पदवी मिळविणारे ते पहिलेच भारतीय विद्यार्थी असावेत. डॉ. आंबेडकरांनी परदेशात अर्थशास्त्राचे जे अध्ययन केले त्यामुळे दलित जाती-जमातींना जे दारिद्रय़ भोगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे त्यांचे सर्व बाजूंनी होणारे आर्थिक शोषण, हे त्यांच्या लक्षात आले. आर्थिकदृष्टय़ा परावलंबी असलेला हा समाज जी मानसिक गुलामगिरी भोगत होता त्याचे मूळ हिंदू समाजव्यवस्थेत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना अस्पृश्यतेच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळी पावले उचलली.''| source = ''' ''- [[w:भालचंद्र फडके|डॉ. भालचंद्र फडके]], ‘नवसमाजरचनेचा स्मृतिकार’ या लेखात'' '''}}
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''‘डॉ. आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक अखंड, उग्र ज्ञानसाधना होती. ते खरेखुरे क्रियावान पंडित होते. भगवान बुद्धांचा धम्मविचार, कबीरांचा प्रेमभाव आणि जोतिरावांची बंडखोरी बरोबर घेऊन बाबासाहेबांनी भारतीय इतिहासाच एक विराट कालखंड आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळून टाकला आहे. डॉ. आंबेडकरांनी विविध पुस्तकांतून अस्पृश्यता निर्मूलनाच्या आपल्या लढय़ाची तात्त्विक भूमिका मांडली. दुसऱ्या आघाडीवर गोलमेज परिषदेपासून तो घटना परिषदेपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी हक्कांची मागणी केली आणि तिसऱ्या आघाडीवर अस्पृश्यांना एका झेंडय़ाखाली आणण्यासाठी रक्ताचे पाणी केले. तसेच सभा, परिषदा, मेळावे, वार्ताहर परिषदा, बैठका, चर्चा इत्यादी अनके मार्गानी जनजागरणाचा वेग कायम ठेवला.''| source = ''' ''- डॉ. भालचंद्र फडके'' '''}}
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. आंबेडकरांनी कष्टाने विद्या मिळविली आणि केवळ पदवी घेण्यापुरता त्यांचा विद्येशी संबंध नव्हता. ते प्रकांडपंडित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विषयांवर त्यांनी केलेले लिखाण व त्यांची भाषणे याची साक्ष देतात. त्यांचा हा गुण केवळ हरिजन बांधवांनीच नव्हे, तर सर्व समाजाने व त्यातही पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावयास हवा. कोणतेही विधान पुराव्याशिवाय ते करीत नसत आणि त्यांचा भर युक्तिवादावर होता. स्वत:च्या मतांवर त्यांची श्रद्धा होती आणि ती मते मांडून लोकांचे मतपरिवर्तन करण्याची तळमळ होती.''| source = ''' ''- संपादक [[w:गोविंद तळवलकर|गोविंद तळवलकर]], डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेल्या ‘मुकियांचा मुखत्यार’ या लेखात'' '''}}