"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
||
ओळ ३५६:
==स्वर ए==
* '''एक घाव दोन तुकडे.''' <br/> - <small>एखाद्या गोष्टीवर किंवा प्रश्नावर तिथल्यातिथे त्वरित निर्णय देणे व चांगलं-वाईट जे असेल ते समोरासमोर न लपवता मांडणी करणे . </small>
* '''एक ना धड भाराभर चिंध्या.''' <br/> - <small> एका वेळी अनेक कामं अंगावर घेतली तर कोणतच काम नीट होत नाही आणि कोणत्याही कामांमध्ये उत्कृष्टता गाठता येत नाही त्यामुळे कोणतच काम सर्वोत्कृष्ट होत नाही , सर्व कामे अर्धवट होतात . </small>
* '''एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत.''' <br/> - <small> दोन तडफदार प्रभावी व्यक्तिमत्व एकाच ठिकाणी काम करणं थोडा अवघड असतं कारण मतभेद असतील तर ते तीव्रपणे मांडण्याची सवय असते थोडक्यात दोन माणसं एकमेकांना छेद देऊ शकतात दुखवू शकतात .</small>
* '''एकादशीच्या घरी शिवरात्र.''' <br/> - <small>आधीच घरामध्ये आर्थिक किंवा इतर अडचणी आहेत त्यात अजून वेगळेच संकट आलं किंवा वेगळी परिस्थिती सामोरी आली तर कठीण प्रसंगात तोंड देणं खूपच अवघड होऊन जातं .नेमकी अशी परिस्थिती निर्माण होणे .</small>
* '''एका कानावर पगडी, घरी बाई उघडी.''' <br/> - <small>बाहेरच्या लोकांसमोर श्रीमंतीचा रुबाब दाखवणे आणि आणि त्याच वेळेला स्वतःच्या घरामध्ये नैमित्तिक खर्चाला पैसे नसणे .</small>
* '''एका हाताने टाळी वाजत नाही.''' ''संस्कृतपर्यायः - नैकेन चक्रेण गती रथस्य। '' <br/> - <small>जसा आपण एका हाताने टाळी वाजवू शकत नाही त्याकरता दोन हातांची गरज असतेच . त्याप्रमाणे कोणतीही चुकीची किंवा वेगळी घटना घडली तर ती कोणा एकट्याची चूक नसून त्या प्रसंगात उपस्थित असणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या वागणुकीचा परिणाम असतो .</small>
* '''एका माळेचे मणी.''' <br/> - <small>काही विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या व्यक्ती त्या साधारणपणे सारख्याच पद्धतीने वर्तणूक करतात उदाहरणार्थ -वर्गातली मुलं सर्वसाधारणपणे सगळेजण मस्ती करतात .</small>
* '''एकटा जीव सदाशिव.''' <br/> - <small>आपण ज्या वेळेस इतर चार माणसांबरोबर राहत असतो त्यावेळेला आपल्याला त्या लोकांच्या सवयीशी , स्वभावाशी जुळवून घ्यावं लागतं पण जर एखादी व्यक्ती एकटीच राहत असेल तर त्या व्यक्तीला फारसा कोणाशी जुळवून घ्यावे लागत नाही . त्यामुळे तो व्यक्ती त्या बाबतीत सुखी असतो .</small>
* '''एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ|''' <br/> - <small>आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करून अडीअडचणीतून मार्ग काढला पाहिजे . जसं एखाद्या अनोळखी रस्त्यावर चालताना आपण एकमेकांच्या असल्याने आणि विचाराने मार्ग काढतो तसंच नियमित जीवनात असं वागणं आचरणात आणायला हवं .</small>
* '''एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारू नये.''' <br/> - <small> एखाद्या माणसाने आपलं नुकसान केलं तर त्याचा राग मनात धरून आपण त्या माणसाचे नुकसान करतो आणि मग हा एकमेकांचा बदला घेण्याचा मार्ग असाच पुढे चालत राहतो यातून कोणीही सुखी होत नाही . आपलं नुकसान झाल्यावर राग येणं जरी स्वाभाविक असलं तरीही समोरच्या व्यक्तीला माफ करून जमायला हवं .</small>
==स्वर ऐ==
|