"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
||
ओळ २५०:
*'''आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?'''<br/> - <small>माकड आधीच भरपूर चाळे करते त्यात मद्य प्यायल्याने काय गोंधळ होईल ह्याचा विचार न केलेला च बरा ! एखादा बिनडोक माणूस जर दारू पिऊन आला तर किती गोंधळ घालू शकेल ?</small>
*'''आपण आपल्याच सावलीला भितो.'''<br/> - <small>कोणी एखादी चूक केली असले असेल किंवा गुन्हा /अपराध केला असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट संशयास्पद वाटायला लागते त्यामुळे त्या व्यक्तीने थोडी जरी हालचाल केली तर त्याची सावली त्यानुसार हलते त्यामुळे सावलीची सुद्धा भीती वाटते वाटू शकते .</small>
*'''आपण आरे म्हटले की कारे आलेच.'''<br/> - <small>एखाद्या घटनेबद्दल प्रतिक्रिया म्हणून आपण वाद घालू लागलो तर समोरची व्यक्ती सुद्धा प्रतिवाद करायचा प्रयत्न करते .त्यामुळे विषय वाढत जातो त्यातून काहीही निष्पन्न होत नाही फक्त वादविवाद झाल्यामुळे दोन्ही व्यक्तींना मानसिक त्रास होतो.</small>
*'''आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.'''<br/> - <small>कोणत्याही वेळी एखादंया घटनेमध्ये बोलताना किंवा वागताना आपण जे करतो ते योग्यच आहे यासाठी आपलं मन आपल्याला ग्वाही देत असतं पण त्याच वेळी दुसरी व्यक्ती काही बोलली / वागली तर आपल्याला त्यांनी काहीतरी चुकीचं केलं असं वाटायला लागते .</small>
*'''आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.'''<br/> - <small>एखाद्या घटनेत होते घटनेमध्ये एका व्यक्तीने चूक केली तर स्वतःवर हाय आळ यायला नको म्हणून ती व्यक्ती दुसऱ्या कुणावर तरी संशय व्यक्त करते व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते .</small>
*'''आपण सुखी तर जग सुखी.'''<br/> - <small> एखादा व्यक्ती जर मनातून सुखी असते असेल तर त्याला आजूबाजूचे जग सुद्धा सुखी आणि आनंदी वाटते ,पण ती व्यक्ती दुःखात असेल तर सगळं चुकीचं चाललंय असं वाटू शकत . थोडक्यात आपला आनंद आपल्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतो .</small>
*'''आपला आळी, कुत्रा बाळी.'''<br/> - <small>आपल्या आळीतला / गल्लीतला मालकीचा कुत्रा जरी जोर जोराने ओरडत असेल , कोणाच्या अंगावर जात असेल तरीही तो आपल्याला छोटाच वाटत वाटतो .त्याचे दोष आपल्याला दिसत नाहीत .</small>
*'''आपलाच बोल, आपलाच ढोल.'''<br/> - <small>एखाद्या व्यक्तीला सतत आपलं स्वतःचं गुणगान गायची किंवा कौतुक करायची सवय असते . दुसऱ्यातील चांगल्या गुणांची दखल न घेता फक्त स्वतःचा मोठेपणा सांगण् त्यांना आवडत असते .</small>
*'''आपली पाठ आपल्याला दिसत नाही.'''<br/> - <small>आपले स्वतःचे दोष आपल्याला दिसत नाही व आपल्या पाठीमागे लोक आपल्याबद्दल काय बोलतात तेही आपल्याला समजत नाही.</small>
*'''आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.'''<br/> - <small>एखादी गोष्ट/वस्तू आपल्या मालकीची असून सुद्धा कधीकधी लोकांसमोर उघडपणे ती वापरता येत नाही व लपवून वापरावी लागते.</small>
*'''आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.'''<br/> - <small>आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर जर फिरताना दिसलो तर त्याचं समर्थन करताना आपण सांगतो की आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे , परंतु दुसरी व्यक्ती अशी कोणाबरोबर तरी फिरताना आढळली तर आपण त्यांचं लफड आहे असं म्हणून मोकळे होतो .</small>
*'''आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.'''<br/> - <small>एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या समारंभात किंवा आनंदात सगळे जण जमले असताना आपण स्वतः काही वावगे बोलू नये किंवा चुकीचं वागू नये. ज्यामुळे चांगल्या प्रसंगाचा विचका होईल .</small>
*'''आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.'''<br/> - <small>आधी आपण आपल्या कुटुंबाच्या गरजाकडे लक्ष द्यावे मगच दुसऱ्यांना मदत करायला जावे . </small>
*'''आपल्या कानी सात बाळ्या.'''<br/> - <small>आपण स्वतःचा गरजांच्या बाबत कधीच समाधानी नसतो . उदाहरणादाखल एखाद्या व्यक्तीच्या कानामध्ये सात आभूषण असली तरीही कमीच आहेत असं त्याला वाटतं असतं .</small>
*'''आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.'''<br/> - <small>आपल्याला स्वतः मधले मोठे दोष दिसत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीने छोटी चूक जरी केली तरी ती आपल्याला खूप मोठी वाटत असते .</small>
*'''आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.'''<br/> - <small>आपल्याला स्वतः मधले मोठे दोष दिसत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीने छोटी चूक जरी केली तरी ती आपल्याला खूप मोठी वाटत असते .</small>
*'''आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.'''<br/> - <small>दगडाला भावना नाहीत त्यामुळे त्याला कोणी उचललं तर त्या व्यक्तीला इजा करायची नाही हे त्याला समजू शकतात शकत नाही . अशावेळी आपण हातात धरलेला दगड चुकून आपल्या हातून निसटला तर त्यामुळे आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते .आपणच केलेल्या कृतीची शिक्षा आपल्याला मिळते .</small>
*'''आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?'''<br/> - <small>एखाद्या वेळेला खूप मोठं संकट आलं तर आपण केलेले छोटे छोटे उपाय या संकटाला घालवू शकत नाहीत किंवा त्याची तीव्रता कमी करू शकत नाहीत .अशा वेळेस न हरता परिस्थिती बदलण्याची वाट बघणे एवढाच उपाय शिल्लक राहतो .</small>
*'''आय नाय त्याला काय नाय.'''<br/> - <small>आपल्या कितीतरी चुका सगळ्यात जास्त आईच माफ करू शकते बाकी जगात कोणीही आपल्याशी इतकं चांगलं वागु शकत नाही . त्यामुळे जर आई आपल्या आजूबाजूला नसेल तर आपल्या बाजुने कोणी नाही हेच खरं असं म्हणावं .</small>
*'''आराम हराम आहे.'''<br/> - <small> </small>
|