"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
||
ओळ ३००:
*'''आली सर तर गंगेत भर.'''<br/> - <small> </small>
*'''आलीया भोगासी असावे सादर.'''<br/> - <small>जे भोग भोगणे आपल्या नशिबात आहे ते आपण स्वीकारायला हवं ! त्याबद्दल कुरकुर करून कसं चालेल ? जी कठीण परिस्थिती समोर आली आहे तिला शांतपणे समजून तोंड देणं व उपाय शोधणे हे करायलाच हवं.</small>
*'''आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.'''<br/> - <small> घरामध्ये नवी नवरी आल्यावर तिला स्वयंपाक करायला , घर चालवायला भांडीकुंडीच नसतील किंवा वस्तूच नसतील तर ती संसार कसा करणार ?</small>
*'''आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.'''<br/> - <small>एखादा आळशी मनुष्य काम करायला उठणे हेच मुळात अवघड आहे . त्यातही तो काम करायला उठल्यावर कोणीतरी चुकून शिंकले तर तो आळशी माणूस आता काय काम होणार नाही , शिंकल्यामुळे अपशकून झाला असं म्हणून परत काम करायचं पुढे ढकलतो. </small>
*'''आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.'''<br/> - <small>आळशी माणसाला काम करायचे नसत , सतत फक्त मोठ्या मोठ्या बाता मारून आपल्याला किती ज्ञान आहे हे जगाला ओरडून सांगायचं असतं त्याला प्रत्येक विषय माहीत असतो असं त्याचं मत असतं .</small>
*'''आळश्याला दुप्पट काम.'''<br/> - <small>ज्यावेळेस एखादा आळशी मनुष्य कामचुकारपणा करायचं ठरवतो तेव्हा हमखास त्याला दुप्पट काम करावे लागते .</small>
*'''आळी ना वळी सोनाराची आळी.'''<br/> - <small> </small>
*'''आळ्श्याला गंगा दूर.'''<br/> - <small>एखादी गोष्ट आपल्याला मनापासून बघायची असेल तर त्यासाठी कितीही कष्ट करायची आपली तयारी असते अगदी दुसर्या देशात जाऊनही आपण ती गोष्ट बघतो पण जर एखादी व्यक्ती आळशी असेल तर आपल्या देशातील गंगा सुद्धा त्याला लांब वाटेल .</small>
*'''आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.'''<br/> - <small>एखाद्या व्यक्तीशी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं व लग्नानंतर असं समजलं किती व्यक्ती नेहमी आजारी असते . त्या व्यक्तीला सकाळी खोकला आणि रात्री ताप येत असेल सदानकदा आजारीच असेल तर कौतुकाने लग्न करण्याला काय अर्थ झाला ?</small>
*'''आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)'''<br/> - <small>पूर्वीच्या काळी वस्तूंची देवाणघेवाण करताना चलन करताना चलना ऐवजी वस्तूंचा वापर केला जात असे . अशा वेळेला एका छोट्याशा वस्तू त्या बदल्यात मोठी वस्तू मागणे अशी परिस्थिती निर्माण होणे . एक छोटासा आवळा देऊन त्याच्या बदल्यात मोठा कोहळा घेऊन फसवणे .</small>
*'''आवसबाई तुझ्याकडे पुनवबाई माझ्याकडे'''<br/> - <small>एकमेकांच्या विरुद्ध परिस्थिती असणे. दर महिन्याला पौर्णिमा (पुनव ) व अमावस्या (आवस) येतात . त्या वेळेला चंद्राची स्थिती एकमेकाविरुद्ध असते . पौर्णिमेच्या वेळेस चंद्र पूर्ण असतो आणि अमावस्येला चंद्र अजिबात असतो . नेहमीच्या आयुष्यात विरुद्ध परिस्थिती म्हणजे उदाहरणादाखल एखाद्या घरी अति दानशूर व्यक्ती असते व दुसऱ्या घरी अति कंजूष व्यक्ती असते , दोन्ही ठिकाणी स्वभावामुळे होणारे त्रास त्रास वेगवेगळे .</small>
*'''आशा सुटेना अन देव भेटेना.'''<br/> - <small>प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी देवाचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं असं वाटत असतं. पण प्रत्येकाला देवाचा दर्शन होतंच असं नाही तरीही मनुष्य त्याची उपासना करणे, प्रार्थना करणे सोडत नाही . देव दिसला नाही तरीही तो आहे या आशेवर आपण जगत असतो.</small>
|