"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९६:
* '''आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा .'''<br/> - <small>एखादा व्यक्ती दिसायला धष्टपुष्ट असेल पण काहीही काम येत नसतील तर काय उपयोग त्याचा ? रेडा कितीही मोठा झाला तरी त्याला कधीच दुध देता येणार नाही .हि म्हण अतिशयोक्तीचे उदाहरण आहे .</small>
 
* '''आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.'''<br/> - <small>कधीकधी पदार्थ वाढायची वाटी छोटी असते किंवा पदार्थच कमी प्रमाणत केलेला असतो ज्यामुळे जिभेला चव जेमतेम कळते , मन किंवा पोट काहीच भरत नाही .जिभेला व पडजीभेला पदार्थाचा मनापासून आस्वाद घेता येत नाही अतृप्तीची भावना येते .</small>
* '''आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.'''<br/> - <small> </small>
 
* '''आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.'''<br/> - <small>अडाणी किंवा मूर्ख माणूस काय आज्ञा देईल ह्याचा काही भरवसा नाही त्याला गाडी फिरवायची हौस आली म्हणून तो हेही सांगू शकेल कि जरा वाटेत येणारी शेते जराशी बाजूला सरकवून ठेवा .</small>
 
* '''आधणातले रडतात, सुपातले हसतात .'''<br/> - <small>तांदुळाच्या दाण्यांबद्दल रूपक अर्थाने हि म्हण आहे तांदुळाचे जे दाणे गरम पाण्यात म्हणजे आधणात जातात ते रडतात म्हणजे त्यांना दुख: होते , त्याचवेळी सुपात पाखडण्यासाठी घेतलेले दाणे त्यांच्याकडे बघून हसत असतात . पण हे करताना सुपातले दाणे विसरतात कि त्यांना हि कधीतरी आधणात जावं लागणारच आहे . बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीकडे बघून क्षणभर आनंदी किंवा समाधानी होतो पण तीच वेळ आपल्यावरही येणारे हे विसरून जातो .</small>
* '''आधणातले रडतात, सुपातले हसतात .'''<br/> - <small> </small>
 
* '''आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.'''<br/> - <small>नवीन माणूस जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा आपण त्याची कौतुक करतो पण हळूहळू त्या व्यक्तीची सवय झाली कि तिच्य्मधील दोष दिसायला लागतात .मग आपली मते बदलायला सुरुवात होते . नवीन सून आली कि भरपूर वेळा तीच नाव प्रेमाने घेतल जाते पण ती नेहमीची झाली कि तिच्याबद्दल उखाळ्यापाखाळ्या सुरु होतात.</small>
* '''आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.'''<br/> - <small> </small>
 
* '''आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.''' <br/> - <small>एक माणूस आधी खंडोबाचा वाघ्या होता ,त्यला खंडोबाचा येळकोट म्हणायची सवय होती त्या व्यक्तीची नेमणूक घोड्याच्या पाग्यावरील अधिकारी म्हणून केली असता जोशपूर्ण आवाजात घोड्यांना युद्धासाठी तयार करायचे असते तिथे तो येळकोट येळकोट च म्हणू लागला .(तळी भरण्याचा विधी असतो ज्यात विषम संख्येने पुरुषांनी येऊन देवाची स्तुती करायची असते तेव्हा ते खंडोबाचा येळकोट असे म्हणतात .) याचा अर्थ मुळ स्वभाव बदलत नाही.</small>
* '''आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.''' <br/> - <small> </small>
 
* '''आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.''' ''संस्कृतपर्यायः '' - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।<br/> - <small>बऱ्याच वेळेला आपण जेव्हा दुसऱ्याला हसतो तेव्हा आपल्या उणिवांकडे आपण दुर्लक्ष करतो . शब्दशः अर्थ घेताना आपल्याच नाकातून शेंबूड गळत असताना आपण दुसर्या व्यक्तीच्या व्यंगाकडे बघून हसणे कितपत योग्य आहे ?</small>
 
*'''आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.'''<br/> - <small>एखादी अंध व्यक्ती / वेंधळी व्यक्ती पाणी भरण्यासाठी गेली व चुकून तिच्याहातून त्या घागरीला भोक पडलं तर तिला ते समजू शकणार नाही व नवीनच प्रश्न उभा राहील .काम माणसाची योग्यता बघून द्यावे .</small>
 
*'''आंधळीपेक्षा तिरळी बरी.'''<br/> - <small> बायको निवडताना किंवा कामासाठी व्यक्ती निवडताना अंध व्यक्तीपेक्षा जिच्या डोळ्यात दोष आहेत पण अंधुक दिसतंय अश्या व्यक्तीची निवड करणे योग्य ठरेल .</small>
 
*'''आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.'''<br/> - <small>एखाद्या कठीण प्रसंगात सर्व बाजूने मनुष्य अडचणीत सापडला तर कोणत्याच बाजूने मार्ग निघू शकत नाही .शब्दशः अर्थ घेताना घरात आई जेवण करून वाढू शकत नसेल आणि वडील बिक मागून अन्न हि मागण्यास मज्जाव करत असतील तर लेकरू पोटातील भूक घेऊन कुठे जाईल ?</small>
*'''आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.'''<br/> - <small> </small>
 
*'''आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.'''<br/> - <small>मालमत्तेवरून / संपत्तीवरून भांडणे होतात हे सर्वांनाच माहित आहे . आई ला वाटत कि आपल्याला अजून एक लेक जन्माला आला तर पोटात संपत्तीची हव असलेल्या मुलाला वाटत कि आपल्याला दुसरा भाऊ नाही तर संपत्तीत वाटेकरी म्हणजे वैरी / शत्रूच जन्माला आलाय .</small>
*'''आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.'''<br/> - <small> </small>
 
*'''आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.'''<br/> - <small>जसे वाईट सांगत लागल्यामुळे मनुष्य वाया जातो तसेच अति लाड केल्यामुळे सुद्धा मुले चुकीच्या वळणाला लागू शकतात .</small>
 
*'''आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.'''<br/> - <small>आपलं नाव सारखं किंवा आडनाव सारखं म्हणजे आपण नक्कीच एकमेकांचे भाऊबंद असणार अशी मुद्दाम जवळीक साधायला येणारी माणसे आपण आजूबाजूला बघतोच .दुरदुरची नाती जुळवून स्वार्थासाठी जवळीक साधणार्यांपासून सावध राहणे केव्हाही चांगले .</small>
*'''आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.'''<br/> - <small> </small>
 
*'''आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.'''<br/> - <small>प्रत्येक माणसाची खरी किंमत तो ज्या गोष्टीत उत्तम आहे तेथेच कळून येते . कुस्तीच्या मैदानात /आखाड्यावर तो पैलवान किती ताकदीचा आहे हे दिसून येते .</small>
 
*'''आग लागल्यावर विहीर खणणे.'''<br/> - <small>एखाद्या ठिकाणी आग लागली तर ती विझवायला पाणी हवं पण त्यावेळेस पाणी हवं म्हणून विहीर खणायला घेणे योग्य होईल का ? लगेच पाणी मिळेल का ? कठीण परिस्थिती अध्वू शकते ह्याचा विचार करून आधीच तजवीज केलेली योग्य असते आयत्या वेळी संकटाचे नियोजन कसे करायचे ह्यावर उपाय मिळणार नाही.</small>
*'''आग लागल्यावर विहीर खणणे.'''<br/> - <small> </small>
 
*'''आगीशिवाय धूर दिसत नाही.'''<br/> - <small>आग वरवर दिसत नसली तरी ती धुमसत असेल तर धूर दिसतोच . कोणतेही वाद / गुन्हा /चुकीचं घडल तर त्यामागेही निश्चित काहीतरी कारण असतेच .</small>
 
*'''आचार भ्रष्टी, सदा कष्टी.'''<br/> - <small>ज्या व्यक्तीने काहीतरी चुकीचे केलेलं असते त्याचा अंतर्मन त्याला खात असते त्यामुळे सदानकदा तो माणूस चिंतेत असतो वरवर आनंदी असल्याचा दिखावा करत असला तरीही .</small>
*'''आचार भ्रष्टी, सदा कष्टी.'''<br/> - <small> </small>
 
*'''आज अंबारी, उद्या झोळी धरी.'''<br/> - <small>पैश्यांच योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे काही व्यक्ती महिन्यातील काही दिवस प्रचंड प्रमाणत पैसे खर्च करताना दिसतात व नंतर काही दिवस लोकांकडे उधारी मागायची वेळ त्यांच्यावर येते . शब्दशः अर्थ घेताना कधी हत्तीच्या अंबारीतून फिरताना दिसतात तर कधीतरी झोळी घेऊन पैसे मागताना दिसतात .</small>
*'''आज अंबारी, उद्या झोळी धरी.'''<br/> - <small> </small>
 
*'''आजा मेला, नातू झाला.'''<br/> - <small>आजोबा मेल्यावर जर नातू जन्माला आला तर त्यांना कसा काय आनंद होईल ? नातू जन्माला येणे म्हणजे घराण्याचा वारस जन्माला आला अस पूर्वीची लोकं मानत होती तेव्हा आजोबा जिवंत असताना आपली पिढी पुढे चालवणारा </small>
*'''आजा मेला, नातू झाला.'''<br/> - <small> </small>
 
*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''<br/> - <small> </small>
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले