"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) छो.ब. →स्वर अ |
||
ओळ ७३:
*'''अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.'''<br/> - <small>शाब्दिक अर्थ घेताना आपल्या अंगाला खाज यायला लागली तर लोकांसमोर आपण काय कृती करतो ह्याचा संयम राहत नाही . एखाद्या चुकीच्या गोष्टीची सवय लागली तर पुढे लोकं काय म्हणतील ह्याचा विचार केला जात नाही .चुकीच्या गोष्टींचेही समर्थन करायची सवय लागते .</small>
*'''अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.'''<br/> - <small>एखादे संकट / काम अचानक अंगावर आले तर अंगातील सगळ बळ,शक्ती वापरून त्या संकटाचा सामना करायला हवा . </small>
*'''अंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं.'''<br/> - <small>आंधळा माणूस धान्य दळत असेल आणि जवळ बसलेला कुत्रा ते पीठ खात असेल तर त्या कुत्र्याला ओरडणार कोण ? आंधळ्या व्यक्तीमुळे कुत्र्याचा फायदाच होतो . असंच समाजात उच्च पदावरील व्यक्तीला आपली जवाबदारी समजत नसेल तर हाताखालची लोकं त्याचा अवास्तव फायदा घेताना दिसतात .</small>
*'''अंधारात केले पण उजेडात आले.'''<br/> - <small>एखादे कृत्य / गुन्हा अंधारात लपवून केले तरी कधीतरी ते उघडकीस येतेच .</small>
*'''अंधेर नगरी चौपट राजा.'''<br/> - एखाद्या नगरावर पूर्णपणे काळोख पसरला आहे आणि राजा त्या अडचणीत अजून भर टाकताना कोणतेतरी आचरट हुकुम देतो ज्यामुळे प्रजा अजून बेजार होते अशी अवस्था . आधीच एक संकट असताना उगाच अजून जास्त अडचणींचा समान करावा लागणे .
*'''अक्कलखाती जमा.'''<br/> - <small>एखादी गोष्ट नवीन शिकताना काही नुकसान झाले तर ते सोडून द्यावे . कोणतीही गोष्ट मिळवताना त्याच मोल द्यावं लागते , एखादी चूक झाली तर अक्कल मिळवण्यासाठी एवढ मोल दिले असे</small> मानावे .
*'''अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे.'''<br/> - <small>एखाद्या व्यक्तीचे आडनाव सहस्रबुद्धे आहे ज्याचा अर्थ हजार व्यक्तीच्या एवढी बुद्धीमत्ता असलेला , पण प्रत्यक्षात त्याला अजिबात अक्कल नाही अशा प्रसंगात नाव किंवा आडनावाचा अर्थ व विरुद्ध वागणूक / सवयी असणे . गंमत करताना एकमेकांना चिडवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे . (सहस्रबुद्धे आडनावाच्या कितीतरी हुशार व्यक्ती समाजात आहेत . चिडवताना आपल बोलण कोणाच्या जिव्हारी लागत नाही ना ! ह्याची अवश्य काळजी घ्यावी .</small>
*'''अकिती आणि सणाची निचिती.'''<br/>▼
*'''अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.'''<br/> - <small>किशोर वयातील मुलीना पुढे येणाऱ्या संसारातील अडचणींची कल्पना नसते त्यांना फक्त वरवरचे दिखावा आकर्षक वाटत असतो . तिचा तो वेडा हट्ट पूर्ण करायचा तर वडिलांना त्यातील धोके जाणवत असतात . अशा वेळेस तिची समजूत घालताना थोडंसं चिडून घरचे तिला सांगत असतात .</small>
*'''अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.'''<br/> - घरोघरी पुरुष बायकोशी बोलताना हेच म्हणतात कि जे काही सगळ आहे ते तुझंच आहे , पण प्रत्यक्षात मात्र सगळे व्यवहार बऱ्याचदा पुरुषांच्या मताप्रमाणेच होताना दिसते . असो , नवीन काळानुसार संदर्भ बदललेले सुद्धा आढळतात .संसाराची गोडी दोन चाकांवर चलते दोन्हीही तितकीच महत्वाची . मजेमजेत बोलतानाच्या म्हणीपैकी एक हि आहे .
*'''अघळ पघळ अन घाल गोंधळ.'''<br/> - <small>प्रत्येकाचं म्हणणे ऐकून त्या नुसार बदल करणे , काटेकोर नियोजन नसणे , समस्यांवर साजेसे उपाय न शोधणे अशा वागण्यातील कमतरतेमुळे कामाचा गोंधळ उडू शकतो .</small>
*'''अठरा विश्व दारिद्र्य तर त्याला छत्तीस कोटी उपाय.'''<br/> - <small>पिढ्यानपिढ्या भरपूर गरिबी असेल तर त्या घरातील व्यक्तींनी मिळून केलेले व्यवसाय /शोधलेले उपाय मोजायचे ठरवले तर ते अगणित असतील . गरिबी दूर करण्यासाठी माणूस हरतऱ्हेचे प्रयत्न करून बघतो .</small>
*'''अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.'''<br/> - <small>अडाणी किंवा मूर्ख माणूस काय आज्ञा देईल ह्याचा काही भरवसा नाही त्याला गाडी फिरवायची हौस आली म्हणून तो हेही सांगू शकेल कि जरा वाटेत येणारी शेते जराशी बाजूला सरकवून ठेवा .</small>
*'''अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.'''<br/> - <small>एखादी मूल्यवान वस्तू / गोष्ट आपल्या हातून हरवली तर ती ज्याला मिळते त्यला त्य्पासून अचानक फायदा होतोच . एखाद्या अडाणी माणसाने भरपूर कष्ट करून जंगलातून लाकडे जमवून त्याची मोळी बनवली व ती गप्पांच्या नादात / इतर धुंदीत वाटेत विसरल्यामुळे ती मोळी जायला मिळते त्यला कष्ट न करताही फायदा मिळतो .</small>
*'''अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.'''<br/> - <small>खोटेपणा करताना छोटीशी देवीची मूर्ती थाळीत ठेवायची तिला पिंजर / कुंकू , हळद लावून ठेवायचं , थोडी पुढ्यात नाणी ठेवायची असे बनावटी भक्त फिरताना आपण सर्रास बघतो . पैशांसाठी देवाचा असा वापर करणारे तेवढे विश्वासार्ह असतात का ?</small>
*'''अढीच्या दिढी सावकाराची सढी.'''<br/> - <small>गावातील सावकार गरीब लोकांना आर्थिक हिशोब न समजल्यामुळे कसा फायदा घेतो . मुळ रकमेच्या अडीचपट , तीनपट इ. चढ्या भावाने व्याजदर लावून दामदुपटीने वसुली करतो व स्वत: श्रीमंत होतो , गरीब बिचारा सावकाराचा कर्ज फेडताना देशोधडीला लागतो .</small>
*'''अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.'''<br/> - <small>गावातील लोकांच्या नानातऱ्हा , वागणे , समस्या , अपराध माफ करून/ बघून / ऐकून बिचाऱ्या देवाचे सुद्धा पोट भरून जात असेल आणि एवढ्या सगळ्यांच्या गोष्टी पोटात साठवताना देवाचं पोट सुद्धा फुगत असेल . बरेच जण आपली छोटी मोठी सुखं दु:ख देवाला हक्काने सांगतात , तो बिचारा पोटात साठवून घेईल सगळ आणि करतोच काय ?</small>
*'''अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.'''<br/> - <small>मोठ पद मिळालं किंवा प्रसिद्धी मिळाली कि भलेभले सदगृहस्थ सुद्धा क्षणिक मोहाला /मायेला बळी पडतात हा अनुभव खरा आहे .</small>
*'''अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.'''<br/> - <small>कोणत्याही गोष्ट / काम पूर्णत्वास नेताना काही ठरविक साच्यातील अनुभवांना /टप्प्यांना सामोरे जावे लागते . जसे तोंडातून चावल्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने आपण नेहमी अन्नग्रहण करू शकत नाही .</small>
*'''अपयश हे मरणाहून वोखटे.'''<br/> - <small>अपयशी माणसाचे दु:ख हे खूप बोचरे असते कधीकधी या यातनांपेक्षा मरण सोपं असेल , असे नको ते विचारही मनात येऊन जातात . अशा वेळी खंबीरपणे अपयशाला मात देऊन पुढे जावे.</small>
*'''अपापाचा माल गपापा.'''<br/> - <small>एका व्यक्तीच्या मालकीची वस्तू दुसऱ्याने पहिल्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्याला विकून टाकणे व त्यातून मिळालेल्या संपत्तीचा यथेच्छ उपभोग घेणे / त्यावर मजा मारणे .
</small>
*'''अपुऱ्या घड्याला डबडब फार.'''<br/> - <small>घडा म्हणजे मातीचं मडके तो जर रिकामा असेल किंवा कमी भरलेला असेल आणि तो बाहेरून टिचकी देऊन वाजवला तर जास्त आवाज येतो ,तेच मडके जर भरलेले असेल तर त्याचा आवाज छोटा येतो . त्याप्रमाणेच ज्या माणसांना व्यावहारिक बुद्धिमत्ता कमी असते ती व्यक्ती स्वत:चे गुणगान स्वत:च करत असताना दिसते .</small>
*'''अप्पा मारी गप्पा.'''<br/> - <small>एखाद्या व्यक्तीचा वेळ जात नसेल किंवा दुसरे काही काम नसेल तर मोठेपणा दाखवून मोठमोठ्या गप्पा मारणारी मंडळी आपल्या आजूबाजूला आढळतात .</small>
*'''अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.'''<br/> - <small>अर्धवट माहितीमुळे केलेली वाटणी मुर्खपणाचीच असते . कोंबडीची समान वाटणी करायची असा ठरवल्यावर अर्धी कोंबडी खायला ठेऊन अर्ध्या कोंबडीने अंडी द्यावी म्हणून तिची मागची बाजू ठेऊन देणे असा विचारही करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणाचे लक्षण आहे .
</small>
*'''अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.'''<br/> - <small>एखाद्या विषयाची /गोष्टीची सखोल माहिती नसतना फक्त त्या घटनेच्या वेळेस हजर आहोत म्हणून बरोबरीचा हक्क सांगणे .</small>
*'''अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.'''<br/> - <small>छोट्याश्या हुशारीचा गर्व होऊन त्याचा बडेजाव मिरवणे .</small>
*'''अल्प बुध्दी, बहु गर्वी.'''<br/> - <small>पुस्तकी बुद्धिमत्ता पुष्कळ असेल आणि अनुभवातून येणारे व्यावहारिक शहाणपण नसेल तर त्या व्यक्तीला आपल्या छोट्याश्या बुद्धिमत्तेचा गर्व होतो , हळूहळू इतरांमधील बुद्धिमत्ता जाणवायला लागली कि गर्व गळून पडतो .</small>
*'''अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.'''<br/> - <small>चहापेक्षा किटली गरम असते त्याप्रमाणे लहान वयात अधिक राग येतो पण मनुष्य विचारी झाला कि त्याच्या रागावर तो नियंत्रण मिळवतो.</small>
*'''अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.'''<br/> - <small>फरसाण विकतात त्या दुकानात मिळते ती अळूवडी ज्या पानापासून बनते ते अळूचे पान . त्या पानामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे अळू चिरल्यावर त्वचेला खाज येणे किंवा खाल्ल्यावर घशात खवखवणे असं होऊ शकते . ह्या म्हणीचा शब्दशः अर्थ घेताना अळू खाणाऱ्या/ बनवणाऱ्या व्यक्तीला जशी खाज येते तसं प्रत्यक्ष अळूच्या झाडाला काय त्रास होत असेल हे कोण सांगेल ? थोडक्यात ज्याचं दु:ख त्यालाच ठाऊक .</small>
*'''अळी मिळी गुपचिळी.'''<br/> - <small>कधीकधी सगळ्यांनी मिळून एखाद्या गोष्टीवर अधिक चर्चा न करणे किंवा समस्या विकोपाला जाऊ नये म्हणून गाजावाजा न होऊ देणे . एकमेकांच्या सहमतीने एखादी गोष्ट/बातमी/माहिती लपवून ठेवणे .</small>
*'''अव्हढासा पोर, घर राखण्यात थोर..'''<br/> - <small>एखादी व्यक्ती वयाने,अनुभवाने लहान असूनही कधीकधी मोठ्या जवाबदाऱ्या पेलताना आढळते .</small>
*'''असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.'''<br/> - <small>पैसे असतील तर भरपूर खर्च करायचा नाहीतर पैसे नाहीत म्हणून सगळ्यांना स्पष्टपणे सांगत सुटायचे .(शिमगा /होळी च्या दिवशी होळी पेटवल्यावर कोणाच्याही नावाने मस्करी करत मोठमोठ्याने बोंबा मारायची पद्धत आहे .तिथे स्पष्ट बोलण्याचा कोणी राग मनात नाही.)</small>
*'''असेल दाम तर होईल काम.'''<br/> - <small>कोणत्याही गोष्टीचे काम करण्याचा योग्य मोबदला दिला कि कोणतीही कामे चटकन होतात .</small>
▲*'''अकिती आणि सणाची निचिती.'''<br/>
|