"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
'''[[w:भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. भीमराव रामजी आंबेडकर]]''' (१४ एप्रिल १८९१- ६ डिसेंबर १९५६) हे थोर [[w:मानवी हक्क|मानवी हक्कांचे]] कैवारी, [[w:भारतीय संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार, बहुश्रुत विद्वान आणि तत्त्वज्ञ आहेत. [[w:डॉ. बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] नावाने सर्वपरिचीत.
 
== विचार ==
*शिका! संघटित व्हा!! संघर्ष करा!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार :-
 
''<blockquote>तुम्ही [[वाघ]]ासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.'' </blockquote>
 
''<blockquote>आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.''</blockquote>
 
''<blockquote>स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय [[नागरिक]] व्हा !''</blockquote>
 
''<blockquote>[[लोकशाही]]चे दोन शत्रू म्हणजे 'हुकूमशाही' आणि माणसां-माणसांत भेद मानणारी 'संस्कृती'. ''</blockquote>
 
''<blockquote>शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.''</blockquote>
 
''<blockquote>लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.''</blockquote>
 
''<blockquote>मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.''</blockquote>
 
''<blockquote>मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.''</blockquote>
 
''<blockquote>[[देव]]वर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.''</blockquote>
 
''<blockquote>[[अस्पृश्यता]] जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.''</blockquote>
 
''<blockquote>स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.''</blockquote>
 
''<blockquote>सर्वांनी आपण प्रथम [[भारतीय]] आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.''</blockquote>
 
''<blockquote>चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.''</blockquote>
 
''<blockquote>उगवत्या [[सूर्य]]ाला नमस्कार करतांना मावळत्या [[चंद्र]]ाला विसरू नका.''</blockquote>
 
''<blockquote>[[माणूस]] हा [[धर्म]]ाकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.''</blockquote>
 
''<blockquote>करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.''</blockquote>
 
''<blockquote>शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या [[स्वातंत्र्य]]ासाठी लढले पाहिजे.''</blockquote>
 
''<blockquote>पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.''</blockquote>
 
''<blockquote>[[ग्रंथ]] हेच गुरू.''</blockquote>
 
''<blockquote>वाचाल तर वाचाल.''</blockquote>
 
''<blockquote>इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.''</blockquote>
 
'' <blockquote>मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.'' </blockquote>
 
'' <blockquote>तिरस्कार माणसाचा नाश करतो.'' </blockquote>
 
'' <blockquote>माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.'' </blockquote>
 
'' <blockquote>एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.'' </blockquote>
 
''<blockquote>भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.''</blockquote>
 
''<blockquote>धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.''</blockquote>
 
''<blockquote>[[लोकशाही]] म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.''</blockquote>
 
''<blockquote>द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.''</blockquote>
 
''<blockquote>बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.''</blockquote>
 
''<blockquote>बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.''</blockquote>
 
''<blockquote>धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.''</blockquote>
 
''<blockquote>मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.''</blockquote>
 
''<blockquote>शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !''</blockquote>
 
''<blockquote>साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.''</blockquote>
 
''<blockquote>शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.''</blockquote>
 
''<blockquote>विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.''</blockquote>
 
''<blockquote>सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.''</blockquote>
 
''<blockquote>सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.''</blockquote>
 
''<blockquote>अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.''</blockquote>
 
''<blockquote>मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.''</blockquote>
 
''<blockquote>जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते.''</blockquote>
 
''<blockquote>ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो [[पुढारी]] होऊ शकत नाही.''</blockquote>
 
''<blockquote>बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.''</blockquote>
 
''<blockquote>[[भगवान बुद्ध]]ांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.''</blockquote>
 
''<blockquote>सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.''</blockquote>
 
''<blockquote>बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.''</blockquote>
 
''<blockquote>बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.''</blockquote>
 
''<blockquote>शक्तिचा उपयोग वेळ - काळ पाहून करावा.''</blockquote>
 
''<blockquote>महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.''</blockquote>
 
''<blockquote>शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.''</blockquote>
 
''<blockquote>आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?''</blockquote>
 
''<blockquote>[[हिंसा]] ही वाईट गोष्ट आहे परंतु [[गुलामी]] ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.''</blockquote>
 
''<blockquote>नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.''</blockquote>
 
''<blockquote>जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.''</blockquote>
 
''<blockquote>वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.''</blockquote>
 
''<blockquote>मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.''</blockquote>
 
''<blockquote>माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.''</blockquote>
 
''<blockquote>पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.''</blockquote>
 
''<blockquote>जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.''</blockquote>
 
''<blockquote>[[शिक्षण]] हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो [[वाघ]]ासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.''</blockquote>
 
''<blockquote>तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.''</blockquote>
 
''<blockquote>मी [[महिला]]ंच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.''</blockquote>
 
''<blockquote>जर या देशात [[शूद्र]]ांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.''</blockquote>
 
''<blockquote>प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.''</blockquote>
 
''<blockquote>मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.''</blockquote>
 
''<blockquote>तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.''</blockquote>
 
''<blockquote>सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.''</blockquote>
 
''<blockquote>जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.''</blockquote>
 
''<blockquote>स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.''</blockquote>
 
''<blockquote>माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.''</blockquote>
 
''<blockquote>कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.''</blockquote>
 
''<blockquote>बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.''</blockquote>
 
''<blockquote>एखादा खरा [[प्रियकर]] ज्या उत्कटेने आपल्या [[प्रेयसी]]वर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या [[पुस्तक]]ांवर प्रेम आहे.''</blockquote>
 
''<blockquote>शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.''</blockquote>
 
''<blockquote>अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.''</blockquote>
 
''<blockquote>काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.''</blockquote>
 
''<blockquote>जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.''</blockquote>
 
''<blockquote>जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.''</blockquote>
 
''<blockquote>माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.''</blockquote>
 
''<blockquote>मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.''</blockquote>
 
''<blockquote>शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र  क्षेत्र आहे.''</blockquote>
 
''<blockquote>सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.''</blockquote>
 
== Quotes ==